स्वामी विवेकानंद आत्मकथा-शंकर
Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
शंकर : जन्म ७ डिसेंबर १९३३. ‘पथेर पांचाली’च्या प्रदेशांत वनग्रामी, त्या काळच्या यशोहर जिल्ह्यात. वडील हरिपद मुखोपाध्याय, पेशाने वकील, दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच कोलकात्याला निघून आले. लेखक तिथेच लहानाचे मोठे झाले, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोलकात्यातच झाल साहित्यसाधनेची सुरुवातही याच ठिकाणी झाली. साहित्यजीवनाचे प्रायोजक, परिचालक आणि सूरकार शंकरीप्रसाद बसू यांच्याशी परिचय झाला हावड्यालाच.
१९४७ साली वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यावर जीवनसंग्रामाची सुरुवात झाली. कधी रस्त्यावरचा फेरीवाला, कधी टाईपराईटर क्लीनर, कधी प्रायव्हेट ट्युशन्स, कधी हावड्याच्या सुप्रसिद्ध विवेकानंद इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक, कधी ज्यूट ब्रोकरच्याकडे कारकून. कधी टाईपिस्ट, कधी स्टेनो. शेवटी कोलकात्याचे अखेरचे ब्रिटिश बॅरिस्टर फ्रेडरिक बारवेल याचे पर्सनल सेक्रेटरी या नात्याने कोलकाता हाय कोर्टाच्या न्यायालयीन कर्मक्षेत्रात पदार्पण. या अनन्यसाधारण वाटचालीनंतर १९५४ साली ‘देश’ या पाक्षिकात ‘कतो अजानारे’ कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासून साहित्यनिर्मिती अविरत चालू आहे. त्यांचं खरं नाव मणीशंकर मुखोपाध्याय. शंकर हे टोपणनाव. याच नावाने त्यानी आपलं सारं लेखन प्रकाशित केलं आहे. शरदचंद्र यांच्यानंतर पूर्व आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी समाजाच्या सर्व थरांमध्ये बांगला कथासाहित्याच्या प्रांतात इतकी लोकप्रियता इतिहासात अजूनतरी नोंदवली गेली नाहीय.
मधल्या काळात सुरेंद्रनाथ कॉलेजमधून आय. ए. पास करून रात्रीच्या कॉलेजमधून बी.ए. डिग्री संपादन केली. पाच वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर ‘चौरंगी’ या कादंबरीची निर्मिती. ही कादंबरी देश या पाक्षिकात १९६१ सालापासून धारावाहिक स्वरूपात प्रकाशित झाली. १० जून १९६२ला डेज पब्लिशर्सतर्फे ही कादंबरी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. आजपर्यंत या कादंबरीच्या एकशेवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी अनेक विषयांवर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अलीकडे रामकृष्ण-विवेकानंद या गुरु-शिष्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी हे महत्त्वाचं आणि वाचनीय पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.