
आमच्या शिक्षणाचं काय ?(Aamchya Shikshanach Kay?) - हेरंब कुलकर्णी
सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला, अजूनही देशात ३ कोटी तर महाराष्ट्रात ९ लाख बालके शाळेबाहेर....
बालमजूर राबताहेत, रस्त्यावरची लेकरं भीक मागताहेत,
साखर कारखान्यांच्या बॉयलर व वीटभट्ट्यांत शिक्षण भाजलं जातंय,
दगडखाणीत शिक्षणाच्या ठिकऱ्या उडताहेत,
आदिवासी लेकरं जंगलातच, तर भटक्यांची पोर
गावोगाव भटकताहेत....
लालबत्तीखाली तर अजूनही अंधारच...
या ३ कोटी शाळाबाह्य लेकरांना तसंच ठेवून
देश महासत्ता होईल का ?
सेन्सेक्सच्या विकासदरांच्या वाजणाऱ्या ढोलताशांत
सरकारला, व्यवस्थेला आणि तुम्हाला, मला
ही लेकरं आर्तपणे विचारताहेत -
आमच्या शिक्षणाचं काय ?
आमच्या शिक्षणाचं काय ?
बालकामगार, रस्त्यावरची मुलं,
स्थलांतरित मजुरांची मुलं तसेच वेश्यावस्ती, मुस्लीम,
आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमाती यांच्या
शाळाबाह्य मुलांचा, महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यात
प्रत्यक्ष फिरून या उद्ध्वस्त बालपणाचा
मांडलेला हा लेखाजोखा...
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
978-93-83850-73-0 |
पुस्तकाची पाने |
284
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |